ज्येष्ठांना १०० टक्के अर्थसहाय्य; ‘वयोश्री’साठी अर्ज केला का?
जालना येथील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात करा अर्ज प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी आप आपल्या जिल्हा येथील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अर्ज दाखल करा
जालना : वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जीवन जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने आणि उपकरणे खरेदी करावी लागतात. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास मदत व्हावी, यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.
सन २०२४-२५ या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या आरोग्यविषयक विविध गरजा पर्ण करू शकतील
कोण आहे पात्र ?
महाराष्ट्रातील रहिवासी, वयाची ६५ वर्षे पूर्ण असावी. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असावे. आधारकार्ड असावे. पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड असावे.
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना?
महाराष्ट्रातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगता यावे, यासाठी ही योजना राबविली जात आहे. अपंगत्व, अशक्तपणावर उपाययोजनांसाठी आवश्यक साधने व उपकरणे खरेदीसाठी ही योजना सहाय्य ठरणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
काय लाभ मिळतो?
या योजनेंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना तीन हजार रुपये साधने खरेदीसाठी मिळणार आहेत. यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेसचा समावेश आहे.
कागदपत्रे काय ?
अर्जदाराकडे आधारकार्ड/ मतदानकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे हवी आहेत.
अर्ज कोठे करायचा?
वयोश्री योजनेच्या लाभासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे अर्ज सादर करावेत, असे कळविले आहे.जालनाकर
या योजनेचा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा
वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य स्थितीत जीवन जगता यावे, यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, ही योजना ज्येष्ठांसाठी चांगली आहे. प्रदीप भोगले, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जालना.